Friday, 13 May 2022

 बीजांकुरण ते वटवृक्षात होणार वृक्षांचे रूपांतर शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकायला मिळावं यासाठी हिरवांकुर शालेय बाल रोपवाटिकेची रुजुवात विद्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये केली.

त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक हॅरी जॉन प्रशासक कामिनी भट मॅम, सोबत मनीषा शिरसाट,रुद्राणी देवरे सचिन पाटील सर योगश माळी शाळेतील विद्यार्थी आणि शैलेश शिरसाठ सर


शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञान सोबतच पर्यावरण जागृती मोठ्या प्रमाणात समावेश असणे ही काळाची गरज आहे. सध्या जरी चार भिंतीतल्या आणि भिंती बाहेरच्या समाज शिक्षणात याचा खुप मोठ्या प्रमाणात समावेश नसला तरी पर्यावरण संस्काराची भविष्यात अधिक गरज भासेल त्या अनुषंगाने सदर उपक्रम स्वयंप्रेरणेने केला जात आहे. या खेरीज विद्यार्थ्यांशी सातत्याने याबाबत बोलले जात आहे त्यात वृक्षारोपणा खेरीज असलेली वृक्ष वाचवणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे या विचारांचे रोपण देखील महत्त्वाचे आहे. प्लास्टिक आणि कचरा जाळणे थांबले पाहिजे. कचरा आणि प्लास्टिक जाळून त्याची विल्हेवाट केली जाते असं जर कोणी म्हणत असेल तर केवढे मोठे अंधविचार आहेत. अखंड विश्वाला तार्किक विचार करण्याची, विवेकी विचारांची अर्थातच वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज आहे त्यासाठी प्रश्न पडले पाहिजेत आणि कार्यकारणभावाने उत्तरांचा शोध घेणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.✍️ शैलेश.

No comments:

Post a Comment