Monday 22 February 2021

कोरोना काळात शालेय शिक्षणातील आव्हाने आणि कुटुंब व्यवस्थेची जबाबदारी..


 

*कोरोना काळात शालेय शिक्षणातील आव्हाने आणि  कुटुंब व्यवस्थेची जबाबदारी.*
Covid-19 अर्थात कोरोनाविषाणूच्या
प्रादुर्भावाने आरोग्य यंत्रणेची  खूप मोठी परीक्षा आहे तसेच ही परीक्षा आहे पालकांची,कुटुंबव्यवस्थेची आणि पर्यायाने समाजाचीही...ते कसे ते खालील मुद्द्यांच्या आधारे समजावून घेऊ.

★कोरोना काळात शाळाबाह्य मुलांचे प्रमाण वाढण्याची भीती.

★वंचितांच्या निवासी शाळांचा प्रश्न.

★मुलींच्या शिक्षणातील गळती आणि स्थगितीचा प्रश्न.

★बालगुन्हेगारीसह अपप्रवृत्तीत वाढ होण्याची भीती.

★विद्यार्थ्यांच्या औपचारिक शिक्षणातील संपादणूक पातळीत घट. Learning loss

देशाचं भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीत आणि विशेषतः औपचारिक शिक्षणातील महत्त्वाची जबाबदारी शाळांवर असते.सध्या कोविड महामारी मुळे शाळा बंद आहेत.
Learning Loss with connecting loss ~ शाळा बंद तरी शिक्षण सुरू शिक्षण सुरू राहण्यासाठी  अधिकाधिक रंजक आणि तेवढं दर्जेदारपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण शालेय व्यवस्था सातत्याने प्रयत्न करत आहे परंतु विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे केवळ अभ्यासक्रम आणि त्यातील घटक शिकवणे एवढ्यापुरता मर्यादित नसतो. विद्यार्थी हा शिक्षणासाठी शाळेत येत असताना समवयस्क मित्रांसोबत शाळेत खेळणे आपला टिफिन शेअर करणे आपल्या मनातील गोष्टी एकमेकांशी शेअर करणे साऱ्या अत्यंत महत्त्वाच्या अनौपचारिक बाबीही तेवढ्याच महत्त्वाच्या असतात  शाळा बंद असल्याने हे सारं थांबलं...
ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था असणारे आणि तशी सुविधा नसणारे पूर्णपणे वंचित असणारे अश्या दोन गटात विद्यार्थी अधिच विभागले गेलेले आहेत.
शाळा बंद असल्यामुळे दैनंदिन वेळापत्रकही कोलमडलं.. वेळापत्रकाचा सर्वात महत्त्वाचा भाग वेळेचे नियोजन आणि शिस्त. हसत खेळत शिक्षणासोबत शिस्त आणि नियोजनाचे धडे आपसूकच त्यांना शाळेत मिळत होते. शाळा आणि शिक्षक करत असलेली ही जबाबदारी पालक कितपत पेलू शकतात ? किंबहुना पालकांना ती पेलावी लागेल. मुल शाळेत आल्यानंतर शिक्षकांची केवळ सुलभकाची भूमिका नसून पालकांची देखील भूमिका असते त्यांची देखभाल, त्यांच्य भावविश्व समजून घेणे इत्यादी विद्यार्थी केंद्रित बाबी शिक्षण यंत्रणा शालेय शिक्षणात आजच्या काळात राबवत आहे.आता ही जबाबदारी शिक्षकांसह  कुटुंबव्यवस्थेची ,पालकांची देखील आहे.
.. *शिक्षकांमध्ये असलेल्या पालकांच्या भूमिकेप्रमाणे पालकात असलेल्या शिक्षकाची भूमिका कोरोना महामारी काळात अत्यंत महत्त्वाची आहे.*
त्यासाठी पालक, कुटुंब व्यवस्था एक जबाबदार घटक म्हणून काय करू शकते ते खलील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ.
◆आपल्या पाल्यासोबत क्वालिटी टाइम घालवणे.
आपल्या व्यवसाय नोकरी नंतर घरी आल्यावर काही  वेळ मुलासोबत खेळण्यासाठी देणं..
◆आपल्या पाल्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणे फार आवश्यक आहे.
◆ किमान एक वेळ जेवण सर्व कुटुंबियांनी सोबत घेणे.
◆ रविवारी मुलांसोबत विविध प्रकारचे खेळ खेळणे (उदाहरणार्थ भाषिक खेळ).
*Let's have a fun Play Let's Enjoy Home Play*
★घरातील कामांसाठी आनंददायी पद्धतीने पाल्यांना सहभागी करून घेणे. 

★घरात फावल्या वेळात आई,आजी, आजोबा यांना मदत करणे. कामाचे वेळापत्रक तयार करणे.
★परिवारातील सदस्य व नातेवाईक यांच्या सोबत घालवलेल्या विविध क्षणांचे वर्णन करणे, शक्य असल्यास प्रवासवर्णन कथाकथन किंवा लेखन करणे  इत्यादी *Home-Play* अनौपचारिक पद्धतीने करता येऊ शकतात.
★पाल्यांच्या वयानुरूप (इयत्तेनुसार) किमान अध्ययन क्षमतांची यादी तयार करणे त्या कामी शाळेतील शिक्षकांची मदत घेणे.
★कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने किमान अध्ययन क्षमता कार्यक्रम कुटुंब स्तरावर आनंददायी पद्धतीने राबवणे.
★ज्या पालकांना शक्य आहे त्यांनी उपलब्ध असलेल्या सर्व साहित्य जसे टीव्ही, कॉम्प्युटर, इंटरनेट मोबाइल यांचा उपयोग करता येऊ शकतो.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक अनुभव देण्याची तयारी शासनस्तरावर असते त्यासाठी शिक्षकांची प्रशिक्षणे होतात. विद्यार्थी हा जास्तीत जास्त वेळ घरी  राहतो त्यादृष्टीने 'पालकत्व' फार महत्वाची जबाबदारी आहे. पालकांनीही प्रशिक्षित होणे आणि कुटुंब व्यवस्था अधिकाधिक बळकट करून  शिक्षणात शालेय व्यवस्थेला मदत करणे गरजेचं आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक जबाबदार नागरिक घडवण्यासाठी पालकासह विविध समाज घटकांनी शिक्षण व्यवस्थेला, शिक्षकांना मदत करणं काळाची गरजे आहे.यात शिक्षक आणि पालकांप्रमाणे सुलभकाच्या भूमिकेत घरातील ताई,दादा ,गल्लीतील अभ्यास मित्र,वर्ग मित्र यांचाही सहभाग आवश्यक आहेच.

कोरोना काळात परीक्षा रद्द झाल्यामुळे खूप मोठ्ठं  नुकसान झालंय म्हणून काही पालक चिंतेत आहेत. " खूपच अभ्यास करून पुस्तकाच्या पुस्तक अक्षरश: पाठ केली होती हो " अशी हि व्यथा काही पालकांनी बोलून दाखवली. विशेषत: आज कोरोनाच्या  भीषण महामारी मध्ये गरज पडल्यास आपल्या प्रत्येकाला किंबहुना महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंजेक्शन किंवा सलाईन लावता येते का ? कोरोना महामारीच्या काळात घरात कोणी आजारी पडल्यावर स्वयंपाक बनवणे किंवा घरातील इतर कामे करता येतात का? बरं या सगळ्याच शिक्षण सरकारच देणार का ? खरं म्हणजे शिक्षण कोणी देईल याची वाट न पाहता आपण शिक्षण घेतले पाहिजे, कुटुंब आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे. कोरोना महामारी स्वतः एक परीक्षा म्हणून आपल्या सगळ्यांसमोर आहे त्यामुळे आणखी वेगळ्या परीक्षेची सध्यातरी गरज नाही. 'कोरोना' या परीक्षेच्या काळात आपण शिकलो नाही तर मग येणारा काळ अधिक कठीण होणार आहे हे  सांगायला ज्योतिषाची गरज नाही..✍️

शैलेश किसन शिरसाठ.
जि.प.उच्च प्राथमिक शाळा शेरी, ता. धरणगाव,जि. जळगाव.