देशातील सर्वच महामानवांना, समाज सुधारकांना जातीपातीत न विभागता जातीअंताचे मार्गदर्शक म्हणून जाणून घेणं महत्त्वाचं आहे,कारण हा लढा जातीपातींचा नसून मानवीय मूल्यांचा लढा आहे असं मला व्यक्तिशः वाटतं..✍️
shaileshshirsath.blogspot.com
Sunday 5 June 2022
महिला आणि ओबीसी सक्षमीकरणाचे आधुनिक भारतातील प्रणेते डॉक्टर बाबासाहेब
मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिक जाणून घेऊया..
कुठल्याही प्रकारच वाचन,अभ्यास तार्किक विचार, समतेचा अर्थ नजाणून घेणारे, जातीभेद मानणारे, वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी रुजवण्यासाठी प्रयत्न न करणारे, विवेक बुद्धी जागृत नसणारे तर बाबासाहेबांना कधीही समजून घेऊ शकत नाही कारण तेवढा आवाकाच नाही वाचनाचा ...
मित्रांनो आपण समतावादी विचारवंतांचे साहित्य वाचन वाढवूया. आपण जर काल्पनिक चमत्काराला नमस्कार करणाऱ्या भाकडकथांचे वाचन करणार असाल तर मग आपलं प्रबोधन होणे कठीण आहे कारण असं चिकित्सेला, वैज्ञानिक दृष्टीकोनाला नाकारणारे साहित्य वाचन आपल्याला बौद्धिक गुलामगिरीकडे नेत असते.
मित्रांनो ज्या लोकांना वाचायला, अभ्यास करायला खरा इतिहास समजून घ्यायला वेळच नाही अशा आपल्या बांधवांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि विशेषतः फुले,शाहू,आंबेडकर,राजाराम मोहन रॉय यांच्यासारख्या कर्त्या सुधारणावादी महामानवांचे विचार पोहोचवूया.
दुर्दैवाने भारतात असंख्य लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळालेच नाही तसे पाहिले तर जगात जिथे जिथे भेदभाव आहे, समतेचा अभाव आहे अशा ठिकाणी तिथल्या मानवी मूल्यांच्या लढ्यासाठी, न्याय हक्कासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखंड प्रेरणास्त्रोत आहेत.आपल्या देशाबाबत विचार करायचा झाल्यास ओबीसींसह सर्व समाज घटकांचे, सर्व महिलांचे ,एकंदरीतच मानवतेचे मसीहा म्हणजे विश्वरत्न,आधुनिक जगाचे खरे नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत.
खरं पाहता ओबीसींना *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जाती आधी ओबीसींसाठी आरक्षण दिले तेही कायद्याने.....*
कळत नकळत काही समाज घटक स्वतःला मागासवर्गीय बांधवांपेक्षा वेगळे आणि उच्च समजण्याची चूक करतात.
Subscribe to:
Posts (Atom)