Wednesday, 29 July 2026

हिरवांकुर ग्रीन सिटी पर्यावरण महोत्सव २०२६

 हिरवांकुर ग्रीन सिटी पर्यावरण महोत्सव २०२६'

आज संपूर्ण जगासमोर प्रदूषण, जलटंचाई, प्लास्टिक कचरा, घटणारी जैवविविधता आणि हवामान बदल यांसारखी गंभीर आव्हाने उभी आहेत. ही समस्या केवळ शासनाच्या प्रयत्नांनी सुटणार नाही; त्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या जीवनशैलीत बदल घडविणे आवश्यक आहे. स्वच्छ, हरित, जलयुक्त आणि प्रदूषणमुक्त समाज घडविण्यासाठी लोकसहभाग हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे. याच विचारातून "हिरवांकुर ग्रीन सिटी पर्यावरण महोत्सव २०२६" या उपक्रमाची संकल्पना साकारली आहे. 

हा महोत्सव केवळ प्रदर्शन किंवा कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ आहे. विद्यार्थी, पालक, महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या सक्रिय सहभागातून पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करून समाजात हरित संस्कार रुजविण्याचा हा प्रयत्न आहे.

या महोत्सवाचा केंद्रबिंदू आहे "विद्यार्थीदशेतून हरित संस्कार". कारण आजचा विद्यार्थी उद्याचा जबाबदार नागरिक आहे. भारतीय वृक्षसंपदा, आयुर्वेद, जलसंवर्धन, सेंद्रिय शेती, घरगुती कंपोस्ट, मधमाशी संवर्धन, पक्षी संरक्षण, हरित कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त जीवनशैली, अक्षय ऊर्जा आणि पर्यावरणपूरक दैनंदिन सवयी यांची माहिती विद्यार्थ्यांमार्फत प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या महोत्सवातून करण्यात आला आहे. 

महोत्सवात भारतीय वृक्षांच्या शेकडो प्रजातींचे प्रत्यक्ष प्रदर्शन, औषधी वनस्पतींची माहिती, घरच्या घरी कंपोस्ट तयार करण्याची प्रात्यक्षिके, सेंद्रिय शेतीतील जीवामृत, पावसाच्या पाण्याचे संधारण, मधमाश्यांचे महत्त्व, पक्षी संवर्धन, प्लास्टिकचे दुष्परिणाम आणि सौर, पवन व जलऊर्जेची माहिती अशा अनेक विषयांवर लोकांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण दिले जाणार आहे. 

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी चित्रकला, लोककला, पर्यावरण विषयक संशोधन, विज्ञान मॉडेल्स, हरित नवोपक्रम, प्रकल्प स्पर्धा आणि पर्यावरणीय प्रयोग यांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःचे स्टॉल उभारण्याची संधी देऊन त्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरवही करण्यात येईल. 

या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोकसहभागातून प्लास्टिक संकलन मोहीम. नागरिकांनी घरातील प्लास्टिक कचरा जमा केल्यास त्याबदल्यात कंपोस्ट, भारतीय वृक्षांची रोपे किंवा पर्यावरणपूरक वस्तू देण्याची अभिनव योजना राबविण्यात येणार आहे. यामुळे प्लास्टिकमुक्त समाजाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल. 

पर्यावरण ही केवळ निसर्गाची नव्हे, तर आपल्या आरोग्याची, अर्थव्यवस्थेची आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेची हमी आहे. प्रत्येकाने एक झाड लावले, पाण्याचा अपव्यय टाळला, घरच्या घरी ओला कचरा व्यवस्थापित केला, प्लास्टिकचा वापर कमी केला आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारली, तर आपल्या शहराचे रूप निश्चितच बदलेल.

या महोत्सवातून लाखो विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये हरित संस्कार निर्माण होतील, जलसंवर्धन व वृक्षसंवर्धनाबाबत व्यापक जनजागृती होईल, प्लास्टिकचा वापर कमी होईल, सेंद्रिय शेतीचा प्रसार वाढेल आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी सकारात्मक सामाजिक वातावरण तयार होईल. स्वच्छ, हरित, जलयुक्त आणि प्रदूषणमुक्त जळगाव घडविण्याची ही एक व्यापक लोकचळवळ ठरेल. 

चला, आपणही या परिवर्तनाचे भागीदार होऊया!

पर्यावरण वाचविण्याची जबाबदारी केवळ शासनाची नाही, ती प्रत्येक नागरिकाची आहे. आपल्या छोट्या-छोट्या कृतीतून मोठा बदल घडू शकतो. एक झाड लावूया, एक थेंब पाणी वाचवूया, प्लास्टिकला नकार देऊया, जैवविविधतेचे संरक्षण करूया आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारूया.

आज आपण घेतलेला हरित संकल्पच उद्याच्या पिढीला सुरक्षित, समृद्ध आणि निरामय भविष्य देईल.

"चला... स्वच्छ, हरित, जलयुक्त आणि प्रदूषणमुक्त भारत घडविण्यासाठी हातात हात घालून पुढे येऊया!" 🌿🌍

 शैलेश शिरसाठ, हिरवांकर फाउंडेशन परिवार.



https://www.instagram.com/reel/Dbvh-XDIuTt/?igsh=cGN2eDNpbnhhaGli

Tuesday, 21 July 2026

चित्त जहाँ भय विहीन शीर्ष जहाँ उच्च रे!

 आज सहजच (?) पुन्हा रवींद्रनाथ टागोर यांची एक कविता आठवली.चित्त जहाँ भय विहीन. त्यातील ओळी खालील प्रमाणे.

 चित्त जहाँ भय विहीन शीर्ष जहाँ उच्च रे! ज्ञान जहाँ मुक्त रे l 

सत्य का गंभीर जहा वाणी के उत्स,रे! 

जिथे मन भयमुक्त असेल, जिथे आपण अभिमानाने मान उंच करून जगू शकू, जिथे ज्ञान सर्वांसाठी मुक्त असेल, अशा भारताची कल्पना कवी रवींद्रनाथ टागोर करतात.

कवितेचा सारांश.

ही कविता म्हणजे कवीची आपल्या मातृभूमीसाठी केलेली एक उदात्त प्रार्थना आहे. भारत केवळ राजकीयदृष्ट्या स्वतंत्र न होता मानसिक, बौद्धिक आणि नैतिकदृष्ट्याही मुक्त व्हावा, अशी टागोरांची इच्छा या कवितेत व्यक्त होते. 



चित्त जहाँ भय विहीन

चित्त जहाँ भय विहीन, शीर्ष जहाँ उच्च रे!

ज्ञान जहाँ मुक्त रे।

सत्य का गंभीर जहाँ वाणी के उत्स रे!

भेद औ' प्रभेद-रची कुंचित दीवार बीच

फिर-फिर कर जगत जहाँ नहीं खंड-खंड रे!

अनवरत परिश्रम निज अति प्रचंड बाहु-दंड

सदैव उठा रहा कि पा सके अखंड रे।

मरे रूढ़ि-बंधन के सूखे मरु-प्रांतर में,

खो नहीं गयी जहाँ प्रवाहिनी विवेक की।

प्रेरित करता है तू मन को उस ओर जहाँ—

निर्मल विचार का नित्य शाश्वत विस्तार है,

अविरल प्रवाहित निर्बाध कर्म-धार है!

प्रभु हे! पिता हे! उस विगत-बंधन स्वर्ग में

उद्बुद्ध कर, जागृत कर, मेरे इस देश को।

Monday, 13 July 2026

आज सहजच (?) आठवलं म्हणून....

 आपल्या कुटुंबीयांचे मतदार यादीतील नाव टिकून राहावे आणि या कामात सरांना मदत व्हावी म्हणून धडपडणाऱ्या विद्यार्थिनीच्या आणि ग्रामस्थांच्या  निमित्ताने  *आज सहजच (?) आठवलं म्हणून....*✍️गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची छान कविता आहे त्याचा अनुवाद पु.ल.देशपांडे यांनी केलाय.. आता तर मला कविता शब्दशः पूर्ण आठवणार नाही पण सार थोडक्यात सांगतो...

 अस्ताला जाणाऱ्या सूर्याला असं वाटलं की माझ्या पश्चात प्रकाशदाणाचं काम कोण करेल ?अशा वेळेला एक  इवलीशी पणती पुढे आली आणि  ती म्हणाली की, " हे सूर्या तुझ्या एवढा प्रकाश देणे मला शक्य नाही, पण एवढ आश्वासन देते की, मी जिथे असेल तिथे अंधार फिरणार सुद्धा नाही", असं म्हटल्यानंतर  ती पणती पुढे जे म्हणते ते खूप महत्त्वाचं आहे....

ती सूर्याला म्हणते, "मी जिथे असेल तिथे अंधार असणार नाही कारण तुझ्या जीन्समध्ये (डीएनए मध्ये) प्रकाश आहे आणि माझ्याही जीन्समध्ये (डीएनए मध्ये) प्रकाश आहे."                               *माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून....*✍️शैलेशकमल.