Tuesday, 24 March 2026

वाऱ्याने चुकून शेजारच्या अंगणातला कचरा आपल्याकडे उडून आला तरी गल्ली मैदान करणारे आपण...

 इराण मधून आलेल्या पेट्रोलला आपल्या बाईक मध्ये टाकून अर्वाच्य धुंदीत बेधुंदपणे स्वार झालेल्या अंधभक्तांनो तुम्हाला गॅसवर शिजवून खाल्लेल्या अन्नामुळे जी ताकद आलेली आहे इराणने पाठवलेला इंधनाच्या जहाजामुळेच हेही लक्षात ठेवा. तरीही आपण किमान तटस्थही न राहता इराण मुस्लिम राष्ट्र असल्याच सांगत त्याच्यावर टीका करत असाल त्याला जरा आवर घाला. याच इराणने आपल्याला प्रत्येक अडचणीच्या वेळेला साथ दिलेली आहे एवढेच नाही तर आपल्या शेजारील पाकिस्तान नावाच्या नापाक राष्ट्राविरुद्ध जेव्हा आपल्याला कोणी साथ दिली नाही तेव्हा इराणनेच साथ दिली. गेल्या काही वर्षात आपण ज्या अमेरिकेचे गोडवे गात आहोत त्या अमेरिकेने सुद्धा आपल्याला पाकिस्तान विरुद्ध साथ न देता पाकिस्तानच्याच बाजूने उभा राहिला अशा वेळेला मुस्लिम राष्ट्र असणा-या ईराणने हिंदू बहुल राष्ट्राच्या बाजूने मतदान देखील केल.

 वाऱ्याने चुकून शेजारच्या अंगणातला कचरा आपल्याकडे उडून आला तरी गल्ली मैदान आपण करतो. परवाच्या हल्ल्यात इराण मधल्या शाळकरी मुलींना अमानुषपणे मारण्यात आलं त्यावेळेला ब्रश शब्दही न काढणारे आपण त्या हल्ल्याचा निषेध करणार नव्हतेच पण आपण एवढे अंधभक्त झालो आहोत की आपण त्या लेकींना श्रद्धांजली सुद्धा वाहू शकलो नाही अर्थात याला अपवाद आहेच पण तेही अपवादानेच . अशावेळी पुन्हा माझा प्रिय मित्र मंगेशने लिहिलेली शब्दरूपी श्रद्धांजली... नव्हे खंत आठवते, त्यात तो म्हणतो...

 त्या निरागस मुलींसाठी 

आपण बांधायला हवे होते सेतू,

सुंदर जगाकडे जाण्यासाठी....

आपण दाखवायला हवी होती सुंदर वाट,

मानवतेकडे घेऊन जाणारी....

आपण द्यायला हवा होता एक परिवेश,

जीवनाच्या सौंदर्यावरचा विश्वास वाढवणारा....

आपण त्यांना द्यायला हवं होतं असं वातावरण,

ज्यात त्यांना वाटली असती सुरक्षितता,प्रेमाची ऊब व विश्वास....


आपण त्यांना काय दिलं????

अकाली मरण,

हिंसक रानटी विश्वाचा परिचय,

बेजबाबदार,अहंकारी,निर्लज्ज वागण्याचं उन्मत्त प्रदर्शन,

आपण 'माणसं' म्हणून अपात्र असल्याच्या साक्षी...

आम्ही आमच्याच पिल्लांना निर्लज्जपणे चिरडून टाकू हा युद्धमाज....

आणि या लेकरांना आपण हे पण दाखवून दिलंय की, या विश्वात तुम्ही किती अदखलपात्र व गौण आहात.

अखिल मानवी विश्वाला प्रेम,करुणा व शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या ख्रिस्त व पैगंबराच्या नावाने आम्ही मनुष्यसंहार करणार,रक्ताचे पाट वाहवणार.

वरून त्यांच्यासाठी,त्यांच्या भूमीसाठी,त्यांच्या राज्यासाठी व त्यांच्या आज्ञार्थ हे करतोय असं सांगत करणार बीभत्स प्रदर्शन दांभिकपणा व ढोंगीपणाचं!

निसर्गाने आपल्याला डुकरं म्हणून जन्माला घातलं असतं तर इतका अनर्थ झाला नसता!

#लेकरांनो आम्हाला माफ करा.



Monday, 23 March 2026

 सन्माननीय मुख्याध्यापक बटू सर

Wednesday, 11 March 2026

जि.प.प्राथमिक शाळा फुलपाट येथे यशवंतराव चव्हाण जयंती उत्साहात साजरी

 यशवंतराव चव्हाण जयंती उत्साहात साजरी

दिनांक १२ मार्च २०२६, गुरुवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व थोर नेते यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याची व त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. त्यांनी शिक्षण, सहकार, शेती व समाजकारण या क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली व त्यांच्या विचारांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, नेतृत्वगुण आणि समाजसेवेची भावना निर्माण व्हावी, हा उद्देश व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श विचारांचे पालन करण्याचा संकल्प केला. अशा प्रकारे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.


 कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ देऊन करण्यात आली. शाळेत पूर्वीपासून स्थापन असलेल्या We Smart या शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या ग्रुप च्या माध्यमातून पर्यावरण रक्षणा बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे.


Wednesday, 4 March 2026

डिजिटल जगात सजग पाऊल...

 आजचा काळ हा डिजिटल युगाचा काळ आहे. मोबाईल, लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि इंटरनेट यामुळे जग अगदी आपल्या हातात आले आहे. या माध्यमांमुळे शिक्षण, मनोरंजन आणि संवाद यामध्ये मोठी क्रांती झाली आहे. विशेषतः आजची मुले ही 'डिजिटल नेटिव्ह' आहेत—म्हणजेच त्यांचा जन्मच डिजिटल वातावरणात झाला आहे. त्यामुळे त्यांना तंत्रज्ञान वापरणे सहज जमते, पण त्याचबरोबर या जगातील धोकेही समजून घेणे तितकेच आवश्यक आहे.

इंटरनेट हे एक विशाल जाळे आहे जिथे माहिती, मनोरंजन आणि संवाद यांचे अमर्याद स्रोत उपलब्ध आहेत.

ऑनलाइन शिक्षण (E-learning)

सोशल मीडिया

गेमिंग

व्हिडिओ प्लॅटफॉर्म

या सर्वांमुळे मुलांचे ज्ञान वाढते, पण याचबरोबर अति वापर, चुकीची माहिती आणि व्यसन यांसारखे धोकेही निर्माण होऊ शकतात.

ऑनलाइन जगातील धोके

मुलांना इंटरनेट वापरताना खालील प्रमुख धोके संभवतात. 

• सायबरबुलिंग (Cyberbullying) – ऑनलाइन छळ किंवा टोमणे

• गोपनीयतेचा भंग (Privacy Issues) – वैयक्तिक माहितीचा गैरवापर

• अयोग्य कंटेंट (Inappropriate Content) – वयानुसार अयोग्य माहिती

• गेमिंग व्यसन (Gaming Addiction) – वेळेचा अपव्यय आणि मानसिक परिणाम

• फेक न्यूज आणि चुकीची माहिती.

पालकांची भूमिका

डिजिटल युगात पालकांची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे.

• मुलांशी मोकळा संवाद ठेवूया.

• त्यांच्या ऑनलाइन सवयी समजून घेऊया, नियंत्रित करूया.

स्क्रीन टाइम निश्चित करूया.

 • आपण पालकांनीही स्वतःही योग्य उदाहरण ठेवूया.

• आवश्यक असल्यास पॅरेंटल कंट्रोल अॅप्स वापरायला हवेत 

पालकांनी मुलांना घाबरवण्याऐवजी जाणीव आणि समज देणे अधिक महत्त्वाचे आहे. आता काहींना असेही वाटू शकेल की हल्ली मुलं घाबरतही नाही आणि या गोष्टींना आम्ही पालक म्हणून अधिक घाबरत आहोत. अर्थात घाबरणे म्हणजे सजग राहणे या अर्थाने असावे. एखाद्या गोष्टीबद्दल घाबरणे म्हणजे अधिक सजग राहणे, इतके घाबरणे आणि दबावात येणे नाही की जो आपला आत्मविश्वासच पूर्णपणे संपवून टाकेल.

शाळेची भूमिका

• शाळा ही मुलांच्या घडणीचे केंद्र आहे.

• डिजिटल साक्षरता (Digital Literacy) शिकवणे

• सुरक्षित इंटरनेट वापराचे प्रशिक्षण.

• कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम.

• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे.

शाळा, पालक आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे.

 सामाजिक घटकांची जबाबदारी

 सामाजिक घटकांनीही या विषयाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

• जनजागृती मोहीम.

• सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करणे.

• मुलांसाठी सकारात्मक ऑनलाइन कंटेंट उपलब्ध करणे.

 मुलांसाठी डिजिटल शिस्त (Digital Discipline)

मुलांना खालील सवयी लावणे आवश्यक आहे:

• ठराविक वेळच स्क्रीन वापरणे.

• अनोळखी लोकांशी संवाद टाळणे.

• वैयक्तिक माहिती शेअर न करणे.

• शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर.

वेळोवेळी ऑफलाइन खेळ आणि उपक्रमात सहभागी होणे.

 त्यासाठी 'पालक शाळा' सातत्याने प्रयत्न करत असते. त्या प्रयत्नांचाच एक भाग. 👇





Saturday, 28 February 2026

 रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित . पालक शाळा

मुलांचे ऑनलाइन जीवन : समजून घ्या आणि सुरक्षित ठेवा* 

सध्या आपण सर्वजण डिजिटल युगात वावरत आहोत. मोबाईल, laptop, smartwatch या सारख्या तांत्रिक माध्यमातून इंटरनेटच्या मायाजाळात आपण सर्वांशी संपर्कात राहत आहोत. त्यामुळे या डिजिटल युगातील पालकत्वाच्या पद्धतीही बदलायला हव्या आहेत. 

आजची पिढी 'डिजिटल नेटिव्ह' आहे, पण त्यांना या जगातील धोक्यांची जाणीव करून देताना *इंटरनेटच्या मायाजालात मुलांना सुरक्षित कसं ठेवायचं? त्यांना डिजिटल शिस्त कशी लावावी?त्यांच्या ऑनलाइन सवयी कशा सुधारायच्या?* या सर्वांचा योग्य वापर ही कुटुंबाची सामुहिक जबाबदारी आहे.दिसणाऱ्या या  डिजिटल विश्वाचे स्वरूप आणि परिणाम समजून घेऊया या सायबर सिक्युरिटी विषयातील तज्ञ योगेश पाटील यांच्याकडून.

 ठिकाण  - व.वा.वाचनालयाचे रा. ग. मानुधने युवा व बाल विभाग सभागृह, नवी पेठ,जळगाव

दिनांक - वेळ - रविवार, १ मार्च, सायं. ४.३०

सूचना- वय वर्ष ५ पुढील मुलांची खेळणे आणि वाचनाची व्यवस्था आहे.




 Use Resources of the city.✍️

आमची मुलं मुंबई-पुण्यात शकतात किंवा आम्ही शहरात राहतो याचा दुसरा अर्थ आमची मुलं मुंबई-पुण्यातील किंवा त्या त्या शहरातील  रिसोर्सेस किती उपयोगात आणतो. या अर्थाने होणेही महत्त्वाचे आहे.पुण्यात राहणं,शिकणं म्हणजे पुण्यात किंवा कुठल्याही शहरात  उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या चांगल्या, सकारात्मक संधीचं सोनं करणं हे देखिल महत्त्वाचं आहे.✍

आपण ग्रामीण भागात राहण्यापेक्षा शहरात राहणं  पसंत का करतो ?  याची अनेक कारणं असली तरी आपल्याला चांगल्या प्रकारचे शिक्षण आणि अधिक चांगल वातावरण मिळावा हा त्यामागचा उद्देश असतो.

परंतु असे असले तरी  शहरात असणाऱ्या विविध क्लासेस आणि शैक्षणिक प्रगती पुरताच त्याचा मर्यादित असा अर्थ आपण घेतो अस मला वाटतं...विद्यार्थ्यांचा, आपल्या पाल्यांचा सर्वार्थाने विकास होण्यासाठी शहरात होणाऱ्या विविध सांस्कृतिक,सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांना सामिल करुन घेणे त्यांना ते प्रत्यक्ष दाखवण हेही आपल काम आहे. एखादा कार्यक्रम किंवा उपक्रम हा परीक्षेसाठी महत्त्वाचा नाही केवळ या कारणासाठी आपल्या स्वतावर किंवा आपल्या पाल्यांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अन्याय करू नका. आपण स्वतःही आणि मुलांनाही दर्जेदार असे कार्यक्रम दाखवा.... दुर्दैवानं फार काही चांगलं दाखवण्यासाठी हल्ली शहरांमध्ये उपलब्ध नाही पण जे दर्जेदार आहे ते नक्की पहा.✍

आपण शहरात राहत असल्यामुळे असल्या प्रकारच्या कार्यक्रमांचा आणि शहरात राहण्याचा चांगला उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं...

अजिंठा फिल्म सोसायटी - कान्ह ललित कला केंद्र द्वारा दि.२८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजित  ५ व्या आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०२६ - जळगाव  हा फिल्म फेस्टिव्हल "चित्रपट सृष्टी आणि भारतीय दृष्टी "या संकल्पनेला समर्पित असून यात विविध विभागांत ८० हून अधिक गुणवत्तापूर्ण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट प्रदर्शित होणार आहे तसेच मास्टर क्लास,चर्चा सत्र,चित्रपट प्रदर्शनी,फिल्म पार्क, टुरींग टाँकीज,ओपन फोरम व चित्रपट विषयक बरेच काही जाणून घेण्याची आपल्या सगळ्यांना एक चांगली संधी लाभली आहे. त्या संधीच आपण सोन करूया ५ व्या आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचा आनंद घ्यावा असे मला व्यक्तिशः वाटतं.


 

This video is created for Thalassemia awareness on 13th November 2021 a day before Children's Day.



Monday, 23 February 2026

 त्यांच्या स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजप्रबोधनाच्या कार्याची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सविस्तर सांगितली.