काही वेळा तुझ्या अस्तित्व संदर्भात खूप चर्चा होतात पण खरं सांगू का देवा तुझ अस्तित्व जाणवतं ते निसर्गतः,परिश्रमाने आपली कौशल्य विकसित केलेल्या कलाकाराच्या कलाकृती पाहिल्या ऐकल्यावर.
देवा तुझ्या अस्तित्वाचा भास होतो गायकांच्या सुरेल गायनातून आणि प्रत्यक्ष निर्जीव असणाऱ्या वाद्यांना दैवी जीवत्व देणाऱ्या कलाकारांच्या कलाकृतीतून...किंबहुना आपल्याकडे असलेल्या कलागुण आपण गेल्यानंतर या जगाला देऊन जातो ही कृती, ही भावना,विचार तुझं अस्तित्व शाश्वत असल्याचं सांगत असतात... आपल्या गायनाने जगाला बेधुंद होऊन जगणं शिकवणाऱ्या गायिका आशा भोसले यांनी या ईहलोकात अखेरचा श्वास घेतला असला तरी त्यांची गायकी, श्वास आणि स्पंदन होऊन अजरामर झाली आहे.
पुनर्जन्म असतो नसतो मला माहीत नाही पण "एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी..." असं गाणाऱ्या आशा पुन्हा पुन्हा पल्लवीत व्हाव्यात पुन्हा पुन्हा जन्माव्यात या आशावादात.... - शैलेशकमल
While reading an online newspaper and browsing social media, I came across a video showing a large gathering along the banks of the Narmada River, where a tanker was releasing milk directly into the water.All this people would have been jailed if they tried to do the same thing abroad.
If this news circulating on social media is true, it raises a serious and thought provoking concern.
It brings up an important question that, Is this an expression of religious faith, or a waste of valuable resources?
From a humanitarian and rational point of view, one must ask whether it is right to pour milk into a river when the same milk could help nourish thousands of children. In a country like India, where many children still suffer from malnutrition and several families struggle to get adequate food every day, such actions need careful reflection.
If the reports are accurate, this situation highlights the need to strike a balance between religious practices and social responsibility. Respecting faith is important, but it should not lead to the wastage of essential resources that could benefit those in need.
Video Courtesy News18
Viral video showing thousands of litres of milk being poured into the Narmada river during a religious ritual. Several people condemned the practice while others defend the practice as an expression of faith but even if it is a religious believe how it comes at the cost of environmental damage and food wastage ? As a responsible citizen one should not support such kind of activity in the name of God.
नदीत दुधाचा टँकर अर्पण: डोळस श्रद्धा, पर्यावरण रक्षण आणि पोषण यांचा समतोल गरजेचा नाही का?
अलीकडे नर्मदा नदी मध्ये धार्मिक कर्मकांडाचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणात दुधाचा टँकर अर्पण केल्याची घटना चर्चेत आली. जर सदर बाब खरी असेल तर श्रद्धा आणि परंपरा या भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असल्या तरी, अशा कृतींचे सामाजिक, पर्यावरणीय आणि नैतिक परिणाम विचारात घेणे आवश्यक आहे.
धार्मिक श्रद्धा की संसाधनांची नासाडी ?
भारतात नदीपूजनाची परंपरा प्राचीन आहे. अनेक ठिकाणी दूध, फुले, नारळ इत्यादी अर्पण केले जाते.परंतु आजच्या परिस्थितीत मानवतावादी आणि विवेकी दृष्टिकोनातून विचार केल्यास असा प्रश्न उभा राहतो की,जे दूध हजारो मुलांच्या पोषणासाठी उपयोगी ठरू शकते, ते नदीत ओतणे योग्य आहे का? अजूनही लाखो मुले कुपोषणाला सामोरे जात आहेत. २०२५ च्या आकडेवारीनुसार ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये आपल्या भारताचा क्रमांक १२३ देशांमध्ये १०२ क्रमांकावर आहे भारताचा क्रमांक अनेक दक्षिण आशियाई देशांपेक्षा मागे आहे.बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका यांची स्थिती भारतापेक्षा चांगली आहे.अनेक कुटुंबांना दररोज पुरेसा आहार मिळत नाही यामुळे धार्मिकतेच्या नावाखाली नदीला दूध अर्पण करण्यासारख्या कृती आणि सामाजिक जबाबदारी यामध्ये संतुलन आवश्यक आहे.नदीत दूध टाकल्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढू शकते यामुळे
जलचर जीवांना हानी पोहोचण्याचा धोका निर्माण होतो याखेरीस पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावतेम्हणजेच, श्रद्धेच्या नावाखाली पर्यावरणाला हानी पोहोचते.आपल्या देशात बालकांमधील कुपोषणाची समस्या मोठी आहे अशा परिस्थितीत दूधासारख्या पौष्टिक अन्नाचा अपव्यय करणे अधिकच गंभीर ठरते.
नैतिक आणि सामाजिक प्रश्न
ही घटना काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करते:
• श्रद्धेच्या नावाने होणारी अंधश्रद्धा महत्त्वाची की मानवकल्याण?
• अन्नाचा अपव्यय करून देव संतुष्ट कसे होतील ?
• समाजातील दुर्बल घटकांची जबाबदारी कोणाची?
• खऱ्या अर्थाने धर्म म्हणजे मानवसेवा आणि समाजकल्याण.
धार्मिक श्रद्धा जपत पुढील उपाय अवलंबता येऊ शकतात:
• दूध नदीत टाकण्याऐवजी गरजू मुलांना वाटप करणे.
• अनाथालय, शाळा, आश्रम येथे अन्नदान करणे
• पर्यावरणपूरक पूजा पद्धती अवलंबणे
• समाजात जागरूकता निर्माण करणे
यामुळे श्रद्धाही जपली जाईल आणि समाजालाही फायदा होईल.
नदीत दुधाचा टँकर अर्पण करणे ही भावना आणि श्रद्धेची अभिव्यक्ती असली तरी, आजच्या काळात ती पर्यावरण आणि समाजाच्या दृष्टीने योग्य नाही.
भारतासारख्या देशात, जिथे अजूनही कुपोषण मोठी समस्या आहे, तिथे अन्नाचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.धर्म म्हणजे केवळ विधी नाही, तर मानवतेची सेवा आहे" — ही जाणीव समाजात निर्माण होणे गरजेचे आहे.
माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून...
Courtesy Lokmat Hindi
ग्लोबल हंगर इंडेक्स (Global Hunger Index – GHI) हा जगातील भूक आणि कुपोषणाची स्थिती मोजणारा एक महत्त्वाचा निर्देशांक आहे. हा अहवाल दरवर्षी Concern Worldwide आणि Welthungerhilfe या संस्थांकडून प्रसिद्ध केला जातो.
globalhungerindex.org
हा निर्देशांक एखाद्या देशातील भूक, कुपोषण आणि आरोग्याच्या स्थितीचे व्यापक चित्र देतो.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट येथे क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी.
शिक्षणतज्ञ, कृषीतज्ञ, अर्थतज्ञ, लेखक, प्रकाशक, आद्य शिवचरित्रकार, आधुनिक नाटककार, वक्ते, मराठी कवितेचे जनक, समाजसुधारक, पुण्याचे नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते, ख्यातनाम उद्योगपती अशा अनंत पैलूंची नाममुद्रा तात्यासाहेबांनी समाजमनावर उमटवली. त्यांच्या जन्मद्वीशताब्दी निमित्त चालू वर्षात अशा पैलूंवर प्रकाश टाकणे तसेच त्यांच्या प्रखर कार्याविषयी व्याख्यानातून लोकजागृती करणे महत्त्वाचे आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, तसेच क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन.🙏
आद्य शिवचरित्रकार महात्मा जोतीराव फुले विस्मृतीत गेलेला इतिहास आणि सत्याचा शोध. 🚩छत्रपती शिवाजी महाराज...! हे नाव घेताच प्रत्येक भारतीयाचे हृदय अभिमानाने भरून येते. आज त्यांच्या नावावर अनेक संघटना, पक्ष आणि प्रतिष्ठाने कार्यरत आहेत. परंतु, आजपासून दीडशे वर्षांपूर्वीचे चित्र याच्या नेमकं उलट होतं. ज्या राष्ट्रपुरुषाने स्वराज्य निर्माण केले, त्यांचे कार्य काळाच्या ओघात विस्मृतीत गेले होते. अशा कठीण काळात शिवरायांच्या इतिहासाला पुन्हा उजाळा देण्याचे आणि त्यांचे पहिले चरित्र लिहिण्याचे ऐतिहासिक कार्य महात्मा जोतीराव फुले यांनी केले. मराठी देवनागरी छापखाना १८०६ मध्ये सुरू झाला. तेव्हापासूनचा इतिहास पाहिला तर शिवरायांवरचे पहिले स्वतंत्र पुस्तक १८६९ मध्ये प्रसिद्ध झाले, ज्याचे लेखक महात्मा फुले होते. मुंबईतील ओरिएन्टल छापखान्यात छापलेले हे पुस्तक पुण्यात स्वतः जोतीरावांच्या वेताळ पेठेतील (सध्याची महात्मा फुले पेठ) दुकानात अवघ्या सहा आण्यांत विक्रीला उपलब्ध होते. जोतीरावांनी या पोवाड्यात महाराजांना 'कुळवाडीभूषण' (शेतकऱ्यांचा मानबिंदू) म्हणून गौरवले.सुमारे एक हजार ओळींच्या या प्रदीर्घ पोवाड्यात त्यांनी शिवरायांच्या पराक्रमाचे आणि त्यांच्या रयतेप्रती असलेल्या प्रेमाचे रसरशीत वर्णन केले आहे. ते लिहितात:
अति महारथी क्षत्रियाचा बाळ यवनाचा काळ त्रेतायुगी!१!
स्वभावे तो शूर रणी भिडणार लढे अनिवार देशासाठी!२!"
शिवराय हे केवळ एका जातीचे किंवा धर्माचे नसून ते 'देशासाठी' लढणारे लोकनेते होते, हे सांगणारे पहिले महात्मा फुले होते.
आज शिवरायांवर अनेक ललित आणि ऐतिहासिक पुस्तके उपलब्ध आहेत. पण जर तुम्हाला शिवरायांचा खरा वारसा आणि त्यांच्या कार्याची मुळे शोधायची असतील, तर खालील चार शिवचरित्रं वाचणे.
प्रत्येक विचारी माणसाने वाचावीत अशी ४ महत्त्वाची शिवचरित्रं:
१. महात्मा जोतीराव फुले ✍️
२. कृ. अ. केळुसकर 📚
३. दि. वि. काळे 📖
४. सेतुमाधवराव पगडी 📜
सत्याचा शोध घेणं हेच खरं शिवप्रेम आहे. अफवांच्या 'विषाणूंपासून' सावध राहा आणि मूळ ग्रंथ वाचा!
दिनांक १२ मार्च २०२६, गुरुवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व थोर नेते यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याची व त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. त्यांनी शिक्षण, सहकार, शेती व समाजकारण या क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली व त्यांच्या विचारांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, नेतृत्वगुण आणि समाजसेवेची भावना निर्माण व्हावी, हा उद्देश व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श विचारांचे पालन करण्याचा संकल्प केला. अशा प्रकारे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ देऊन करण्यात आली. शाळेत पूर्वीपासून स्थापन असलेल्या We Smart या शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या ग्रुप च्या माध्यमातून पर्यावरण रक्षणा बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे.
आजचा काळ हा डिजिटल युगाचा काळ आहे. मोबाईल, लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि इंटरनेट यामुळे जग अगदी आपल्या हातात आले आहे. या माध्यमांमुळे शिक्षण, मनोरंजन आणि संवाद यामध्ये मोठी क्रांती झाली आहे. विशेषतः आजची मुले ही 'डिजिटल नेटिव्ह' आहेत—म्हणजेच त्यांचा जन्मच डिजिटल वातावरणात झाला आहे. त्यामुळे त्यांना तंत्रज्ञान वापरणे सहज जमते, पण त्याचबरोबर या जगातील धोकेही समजून घेणे तितकेच आवश्यक आहे.
इंटरनेट हे एक विशाल जाळे आहे जिथे माहिती, मनोरंजन आणि संवाद यांचे अमर्याद स्रोत उपलब्ध आहेत.
ऑनलाइन शिक्षण (E-learning)
सोशल मीडिया
गेमिंग
व्हिडिओ प्लॅटफॉर्म
या सर्वांमुळे मुलांचे ज्ञान वाढते, पण याचबरोबर अति वापर, चुकीची माहिती आणि व्यसन यांसारखे धोकेही निर्माण होऊ शकतात.
ऑनलाइन जगातील धोके
मुलांना इंटरनेट वापरताना खालील प्रमुख धोके संभवतात.
• सायबरबुलिंग (Cyberbullying) – ऑनलाइन छळ किंवा टोमणे
• अयोग्य कंटेंट (Inappropriate Content) – वयानुसार अयोग्य माहिती
• गेमिंग व्यसन (Gaming Addiction) – वेळेचा अपव्यय आणि मानसिक परिणाम
• फेक न्यूज आणि चुकीची माहिती.
पालकांची भूमिका
डिजिटल युगात पालकांची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे.
• मुलांशी मोकळा संवाद ठेवूया.
• त्यांच्या ऑनलाइन सवयी समजून घेऊया, नियंत्रित करूया.
स्क्रीन टाइम निश्चित करूया.
• आपण पालकांनीही स्वतःही योग्य उदाहरण ठेवूया.
• आवश्यक असल्यास पॅरेंटल कंट्रोल अॅप्स वापरायला हवेत
पालकांनी मुलांना घाबरवण्याऐवजी जाणीव आणि समज देणे अधिक महत्त्वाचे आहे. आता काहींना असेही वाटू शकेल की हल्ली मुलं घाबरतही नाही आणि या गोष्टींना आम्ही पालक म्हणून अधिक घाबरत आहोत. अर्थात घाबरणे म्हणजे सजग राहणे या अर्थाने असावे. एखाद्या गोष्टीबद्दल घाबरणे म्हणजे अधिक सजग राहणे, इतके घाबरणे आणि दबावात येणे नाही की जो आपला आत्मविश्वासच पूर्णपणे संपवून टाकेल.
शाळेची भूमिका
• शाळा ही मुलांच्या घडणीचे केंद्र आहे.
• डिजिटल साक्षरता (Digital Literacy) शिकवणे
• सुरक्षित इंटरनेट वापराचे प्रशिक्षण.
• कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम.
• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे.
शाळा, पालक आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे.
सामाजिक घटकांची जबाबदारी
सामाजिक घटकांनीही या विषयाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
• जनजागृती मोहीम.
• सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करणे.
• मुलांसाठी सकारात्मक ऑनलाइन कंटेंट उपलब्ध करणे.
मुलांसाठी डिजिटल शिस्त (Digital Discipline)
मुलांना खालील सवयी लावणे आवश्यक आहे:
• ठराविक वेळच स्क्रीन वापरणे.
• अनोळखी लोकांशी संवाद टाळणे.
• वैयक्तिक माहिती शेअर न करणे.
• शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर.
वेळोवेळी ऑफलाइन खेळ आणि उपक्रमात सहभागी होणे.
त्यासाठी 'पालक शाळा' सातत्याने प्रयत्न करत असते. त्या प्रयत्नांचाच एक भाग. 👇