आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेला परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट ता धरणगाव जि जळगाव येथील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.
आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेला 'परीक्षा पे चर्चा' हा कार्यक्रम परीक्षांपुरता मर्यादित नव्हता, तर विकसित भारत २०४७ या स्वप्नाशी विद्यार्थ्यांना जोडणारा एक अत्यंत प्रेरणादायी संवाद होता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत भारताच्या भविष्यातील वाटचालीत विद्यार्थ्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे ठामपणे अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी सांगितले की, आजचा विद्यार्थीच २०४७ मधील विकसित भारताचा शिल्पकार आहे.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना फक्त परीक्षा जिंकण्यासाठी नव्हे, तर स्वतःचे भविष्य आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रेरित करणारा ठरला.













