काही वेळा तुझ्या अस्तित्व संदर्भात खूप चर्चा होतात पण खरं सांगू का देवा तुझ अस्तित्व जाणवतं ते निसर्गतः,परिश्रमाने आपली कौशल्य विकसित केलेल्या कलाकाराच्या कलाकृती पाहिल्या ऐकल्यावर.
देवा तुझ्या अस्तित्वाचा भास होतो गायकांच्या सुरेल गायनातून आणि प्रत्यक्ष निर्जीव असणाऱ्या वाद्यांना दैवी जीवत्व देणाऱ्या कलाकारांच्या कलाकृतीतून...किंबहुना आपल्याकडे असलेल्या कलागुण आपण गेल्यानंतर या जगाला देऊन जातो ही कृती, ही भावना,विचार तुझं अस्तित्व शाश्वत असल्याचं सांगत असतात... आपल्या गायनाने जगाला बेधुंद होऊन जगणं शिकवणाऱ्या गायिका आशा भोसले यांनी या ईहलोकात अखेरचा श्वास घेतला असला तरी त्यांची गायकी, श्वास आणि स्पंदन होऊन अजरामर झाली आहे.
पुनर्जन्म असतो नसतो मला माहीत नाही पण "एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी..." असं गाणाऱ्या आशा पुन्हा पुन्हा पल्लवीत व्हाव्यात पुन्हा पुन्हा जन्माव्यात या आशावादात.... - शैलेशकमल
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट येथे क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी.
शिक्षणतज्ञ, कृषीतज्ञ, अर्थतज्ञ, लेखक, प्रकाशक, आद्य शिवचरित्रकार, आधुनिक नाटककार, वक्ते, मराठी कवितेचे जनक, समाजसुधारक, पुण्याचे नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते, ख्यातनाम उद्योगपती अशा अनंत पैलूंची नाममुद्रा तात्यासाहेबांनी समाजमनावर उमटवली. त्यांच्या जन्मद्वीशताब्दी निमित्त चालू वर्षात अशा पैलूंवर प्रकाश टाकणे तसेच त्यांच्या प्रखर कार्याविषयी व्याख्यानातून लोकजागृती करणे महत्त्वाचे आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, तसेच क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन.🙏
शाळेत शिकवले जाणारे धडे फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नसतात, तर ते अनुभवातून अधिक प्रभावीपणे मनावर कोरले जातात. अलीकडेच आमच्या शाळेत मुलांना पाणी वाचवण्याच्या महत्त्वावर आधारित एक शॉर्ट मूवी दाखवण्यात आली आणि त्या अनुभवाने मुलांच्या मनावर खोल परिणाम केला.
ही शॉर्ट मूवी अतिशय साध्या पण प्रभावी पद्धतीने तयार केली होती. सुरुवातीला एका गावात पाण्याची कमतरता कशी निर्माण होते, लोकांना कशा अडचणींना सामोरे जावे लागते, आणि पाण्याचा अपव्यय कसा संकटात बदलतो हे दाखवले होते. पुढे त्याच गावातील काही मुले आणि नागरिक एकत्र येऊन पाणी वाचवण्यासाठी छोटे-छोटे उपाय कसे करतात,जसे की नळ बंद ठेवणे, पावसाचे पाणी साठवणे, झाडे लावणे हेही खूप सुंदरपणे सादर केले होते.
मुलांनी हा चित्रपट अत्यंत लक्षपूर्वक पाहिला. चित्रपटातील दृश्ये, संवाद आणि भावनिक प्रसंग यामुळे ते पूर्णपणे त्या कथेत गुंतून गेले.या अनुभवातून मुलांना केवळ माहितीच मिळाली नाही, तर त्यांच्या विचारांमध्येही बदल दिसून आला. चित्रपटानंतर घेतलेल्या चर्चेत मुलांनी स्वतःहून अनेक उपाय सुचवले.घरात पाणी वाया जाऊ देणार नाही, दात घासताना नळ बंद ठेवणार, आई-वडिलांनाही पाणी जपून वापरण्यास सांगणार इत्यादी. काही मुलांनी तर आपल्या घरात पाणी साठवण्यासाठी छोट्या टाक्या तयार करण्याची कल्पनाही मांडली.
शिक्षक म्हणून हा अनुभव अत्यंत समाधानकारक होता. कारण मुलांनी केवळ पाहिले नाही, तर ते समजून घेतले आणि त्यावर कृती करण्याची तयारीही दाखवली. अशा प्रकारच्या शॉर्ट मूवीजमुळे शिक्षण अधिक जिवंत आणि परिणामकारक बनते.
आजच्या काळात पाणी ही एक अमूल्य संपत्ती आहे. “पाणी वाचवा, जीवन वाचवा” हा संदेश मुलांच्या मनात रुजवणे खूप आवश्यक आहे. आणि अशा प्रभावी माध्यमांद्वारे दिलेला संदेश नक्कीच दीर्घकाळ टिकतो.
दिनांक १२ मार्च २०२६, गुरुवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व थोर नेते यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याची व त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. त्यांनी शिक्षण, सहकार, शेती व समाजकारण या क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली व त्यांच्या विचारांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, नेतृत्वगुण आणि समाजसेवेची भावना निर्माण व्हावी, हा उद्देश व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श विचारांचे पालन करण्याचा संकल्प केला. अशा प्रकारे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ देऊन करण्यात आली. शाळेत पूर्वीपासून स्थापन असलेल्या We Smart या शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या ग्रुप च्या माध्यमातून पर्यावरण रक्षणा बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे.
आजचा काळ हा डिजिटल युगाचा काळ आहे. मोबाईल, लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि इंटरनेट यामुळे जग अगदी आपल्या हातात आले आहे. या माध्यमांमुळे शिक्षण, मनोरंजन आणि संवाद यामध्ये मोठी क्रांती झाली आहे. विशेषतः आजची मुले ही 'डिजिटल नेटिव्ह' आहेत—म्हणजेच त्यांचा जन्मच डिजिटल वातावरणात झाला आहे. त्यामुळे त्यांना तंत्रज्ञान वापरणे सहज जमते, पण त्याचबरोबर या जगातील धोकेही समजून घेणे तितकेच आवश्यक आहे.
इंटरनेट हे एक विशाल जाळे आहे जिथे माहिती, मनोरंजन आणि संवाद यांचे अमर्याद स्रोत उपलब्ध आहेत.
ऑनलाइन शिक्षण (E-learning)
सोशल मीडिया
गेमिंग
व्हिडिओ प्लॅटफॉर्म
या सर्वांमुळे मुलांचे ज्ञान वाढते, पण याचबरोबर अति वापर, चुकीची माहिती आणि व्यसन यांसारखे धोकेही निर्माण होऊ शकतात.
ऑनलाइन जगातील धोके
मुलांना इंटरनेट वापरताना खालील प्रमुख धोके संभवतात.
• सायबरबुलिंग (Cyberbullying) – ऑनलाइन छळ किंवा टोमणे
• अयोग्य कंटेंट (Inappropriate Content) – वयानुसार अयोग्य माहिती
• गेमिंग व्यसन (Gaming Addiction) – वेळेचा अपव्यय आणि मानसिक परिणाम
• फेक न्यूज आणि चुकीची माहिती.
पालकांची भूमिका
डिजिटल युगात पालकांची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे.
• मुलांशी मोकळा संवाद ठेवूया.
• त्यांच्या ऑनलाइन सवयी समजून घेऊया, नियंत्रित करूया.
स्क्रीन टाइम निश्चित करूया.
• आपण पालकांनीही स्वतःही योग्य उदाहरण ठेवूया.
• आवश्यक असल्यास पॅरेंटल कंट्रोल अॅप्स वापरायला हवेत
पालकांनी मुलांना घाबरवण्याऐवजी जाणीव आणि समज देणे अधिक महत्त्वाचे आहे. आता काहींना असेही वाटू शकेल की हल्ली मुलं घाबरतही नाही आणि या गोष्टींना आम्ही पालक म्हणून अधिक घाबरत आहोत. अर्थात घाबरणे म्हणजे सजग राहणे या अर्थाने असावे. एखाद्या गोष्टीबद्दल घाबरणे म्हणजे अधिक सजग राहणे, इतके घाबरणे आणि दबावात येणे नाही की जो आपला आत्मविश्वासच पूर्णपणे संपवून टाकेल.
शाळेची भूमिका
• शाळा ही मुलांच्या घडणीचे केंद्र आहे.
• डिजिटल साक्षरता (Digital Literacy) शिकवणे
• सुरक्षित इंटरनेट वापराचे प्रशिक्षण.
• कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम.
• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे.
शाळा, पालक आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे.
सामाजिक घटकांची जबाबदारी
सामाजिक घटकांनीही या विषयाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
• जनजागृती मोहीम.
• सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करणे.
• मुलांसाठी सकारात्मक ऑनलाइन कंटेंट उपलब्ध करणे.
मुलांसाठी डिजिटल शिस्त (Digital Discipline)
मुलांना खालील सवयी लावणे आवश्यक आहे:
• ठराविक वेळच स्क्रीन वापरणे.
• अनोळखी लोकांशी संवाद टाळणे.
• वैयक्तिक माहिती शेअर न करणे.
• शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर.
वेळोवेळी ऑफलाइन खेळ आणि उपक्रमात सहभागी होणे.
त्यासाठी 'पालक शाळा' सातत्याने प्रयत्न करत असते. त्या प्रयत्नांचाच एक भाग. 👇
Saturday, 28 February 2026
रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित . पालक शाळा
मुलांचे ऑनलाइन जीवन : समजून घ्या आणि सुरक्षित ठेवा*
सध्या आपण सर्वजण डिजिटल युगात वावरत आहोत. मोबाईल, laptop, smartwatch या सारख्या तांत्रिक माध्यमातून इंटरनेटच्या मायाजाळात आपण सर्वांशी संपर्कात राहत आहोत. त्यामुळे या डिजिटल युगातील पालकत्वाच्या पद्धतीही बदलायला हव्या आहेत.
आजची पिढी 'डिजिटल नेटिव्ह' आहे, पण त्यांना या जगातील धोक्यांची जाणीव करून देताना *इंटरनेटच्या मायाजालात मुलांना सुरक्षित कसं ठेवायचं? त्यांना डिजिटल शिस्त कशी लावावी?त्यांच्या ऑनलाइन सवयी कशा सुधारायच्या?* या सर्वांचा योग्य वापर ही कुटुंबाची सामुहिक जबाबदारी आहे.दिसणाऱ्या या डिजिटल विश्वाचे स्वरूप आणि परिणाम समजून घेऊया या सायबर सिक्युरिटी विषयातील तज्ञ योगेश पाटील यांच्याकडून.
ठिकाण - व.वा.वाचनालयाचे रा. ग. मानुधने युवा व बाल विभाग सभागृह, नवी पेठ,जळगाव
दिनांक - वेळ - रविवार, १ मार्च, सायं. ४.३०
सूचना- वय वर्ष ५ पुढील मुलांची खेळणे आणि वाचनाची व्यवस्था आहे.