वरील प्रश्न पडल्यास खालील बाबींवर विचार करूया .
• ऐन सुट्टीच्या कालावधीत आणि सणांच्या कालावधीत तीन चार पट भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहन व्यवस्थेला जाब विचारणे आणि योग्य भाडेसाठी लोकशाही मार्गाने आग्रह धरणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.
• संघ भावना आणि एकजुटीसाठी असणारे खेळ जातीपातीत विभागून फक्त विशिष्ट जातीच्या खेळाडूंनाच स्पर्धेत भाग घेण्यास परवानगी देणाऱ्या स्पर्धेचा निषेध न करता, विरोध न करता प्रोत्साहित करणे आणि जन्माने मिळालेल्या आपापल्या जाती आणि स्वतः कमावलेला जाती श्रेष्ठत्वाचा अहंभाव कुराळात बसणे बंद करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.
• छत्रपती शिवरायांच स्वराज्य म्हणजे रयतेच राज्य हे वैशिष्ट्य सांगून शिवरायांनी स्थापित केलेले स्वराज्य हे कोणा एका जाती धर्मियांसाठी नसून न्यायाचे राज्य होतं याचा प्रचार प्रसार करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.
• विवेकवादी विचारांचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार आणि अंगीकार करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.
• स्त्रियांवरील लिहिल्या गेलेल्या आणि सादर केल्या जाणाऱ्या अश्लील,अश्लाघ्य गीत संगीताचा निषेध करणे आणि त्यावर बंदी आणणे. निषेध नोंदवण्यासाठी आणि बंदी आणण्यासाठी बोलणे, लिहिणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.
• आपल्या घरच्या किंवा सार्वजनिक कार्यक्रमात ध्वनी प्रदूषणाच्या माध्यमातून इतरांना छळणे थांबवणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.
• एखादी दुर्दैवी घटना किंवा आपातकालीन परिस्थिती खेरीज आपल्या खाजगी कार्यक्रमांसाठी सार्वजनिक रस्ता अडवणे, बंद करणे शक्य असल्यास टाळले पाहिजे आणि असे टाळणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.
• सार्वजनिक सण उत्सव साजरे करत असतांना पैशाची प्रचंड उधळपट्टी ऐवजी शिक्षणावर किंवा इतर लोक हितासाठी पैसा खर्च करणे म्हणजेच शिवरायांच्या रयतेच्या राज्यासाठी काम करणे होय. नैतिकतेच्या आधारावर सार्वजनिक हिताचे निर्णय घेणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.
वरील सर्व बाबी आपली नोकरी,व्यवसाय कौटुंबिक जबाबदारी सांभाळून करता येऊ शकतात, बोलता येऊ शकत,लिहिता येऊ शकत आपण किमान 20 -25 लोकांपर्यंत विचार पोहोचवू शकतो.
शिवरायांच राज्य हे रयतेच राज्य असल्यामुळे शिवरायांना देखील वरील उल्लेख केलेल्या चुकीच्या बाबी आवडल्या नसत्या शिवरायांचा लढा हा मानवी मूल्यांचा लढा होता कोण्या एका धर्मा विरोधात नव्हे तर अधर्मा विरोधात होता म्हणूनच शिवरायांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते. शिवराय आणि रयत एकमेकांवर जीवापाड प्रेम करत कारण शिवशाही म्हणजे 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'.
तुम्हास शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमचा शैलेश.✍️
Image courtesy bolbhidu









