Saturday 12 August 2017

शाळेत आपण परीक्षा घेणारे परीक्षक की मुक्त अनुभव देणारे सुलभक ?

माझ्या 'We Smart' शिक्षक,पालक प्रशिक्षणातील एक महत्त्वाचा भाग..👇 जगातील सगळ्यात सोपं काम परीक्षा घेणं तेही दुसऱ्याची आणि मग मोठ्या दिमाखात यश ठरवणे...काय चांगलं, उत्कृष्ट,एक नंबर आणि शेवटचा नंबर..हा पहिला तो दुसरा तो शेवटचा असा गुणानुक्रमांक आपण काढत नसलो तरी समाजातील काही घटक अघोषित गुणानुक्रमांक ठेवतात परंतु खरंच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांना आपण निश्चित केलेली परीक्षा आणि तिचे निकष योग्य न्याय देऊ शकतात का?..याचाही विचार व्हावा. मी व्यक्तीशी असं मानतो की शिकवण हे कृत्रिम तर शिकण हे नैसर्गिक आहे.म्हणूनच आपण शिक्षकापेक्षाही सुलभकाच्याच भूमिकेत असले पाहिजे. कुणी शिकल तरच आपल शिकवण खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकत नाही तर व्यर्थच. तुम्ही कोणाला शिकवू शकत नाही जोपर्यंत की कोणी शिकत नाही,शिकण्याची नैसर्गिक इच्छा आणि कृती होत नाही. यासाठी नेहमी मी एक उदाहरण देतो, ते म्हणजे एका इमारतीतील एका घरच्या खिडकीतून ज्या वेळेला एक १० वर्षाच मुल खाली रस्ता ओलांडनाऱ्या आजोबांकडून रस्ता कसा ओलांडून नये हे शिकतो.ज्या वेळेला रस्ता ओलांडणारे आजोबा रस्त्याच्या एका बाजूनेच बघून रस्ता ओलांडतात आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका सायकल स्वाराला धडकतात.आपल्या घराच्या खिडक्यांतून बघणारा तो दहा वर्षाचा मुलगा रस्ता ओलांडताना काय काळजी घेतली गेली पाहिजे हे आजोबांच्या उदाहरणावरून शिकतो. या प्रसंगात आजोबांनी त्या मुलाला काहीही शिकवले नाही किंबहुना आजोबांना हे ही माहितीच नाही की कुणीतरी त्यांना बघत आहे आणि त्यांच्या चुकीमधून शिकत आहे. इथे शिकवण्याची क्रिया झाली नाही पण शिकण्याची क्रिया झाली. मला असं वाटतं शिकणं हे असंच नैसर्गिक आहे त्यामुळे आपण कोणाला शिकवू शकत नाही कुणाला शिकायचं असेल तर मात्र ती व्यक्ती स्वयंप्रेरणेने शिकू शकते..✍️ शैलेश.
shaileshshirsath.blogspot.com Special Thanks (photo Image Courtesy) Swastik Arora--Pixabay Image Added on December7th 2023