Tuesday, 31 January 2023

We Smart या व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमांतर्गत २००९-१० या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ७ वी ८ वी आणि ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला Money PlanT उपक्रम.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात फक्त शालेय अभ्यासक्रमाच्याच विषयास आपण खूप सारे महत्त्व देतो. विद्यार्थी हे राष्ट्राचे आधारस्तंभ उद्याचे नागरिक अशी संबोधने आपण लावतो. कोणत्याही राष्ट्राच्या विकासात महत्त्वाचा घटक असतो त्या राष्ट्राचा सर्व समावेशक आर्थिक विकास. राष्ट्राच्या आर्थिक विकासास असाधारण महत्त्व असल्याने त्या राष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात आर्थिक बचत तसेच आर्थिक बाबीं संदर्भात ज्ञान गुंतवणुकीचे महत्त्व त्यासाठी लागणारे आर्थिक नियोजन इत्यादीचे ज्ञान आवश्यक आहे शालेय विद्यार्थ्यांना या संदर्भात ज्ञान असावे या व्यापक व सकारात्मक उद्देशाने वई स्मार्ट व्यक्तिमत्त्व उपक्रमात सन २००९-१० या वर्षा पासून इयत्ता ७ वी ८ वी आणि ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी Money PlanT या शैक्षणिक उपक्रमाचा अंतर्भाव केलेला आहे. प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांनी कुठल्याही आर्थिक व्यवहाराचा विचार करणे अपेक्षित नसते तर हसत खेळत शिक्षण घेणे ज्ञानार्जन करणे अपेक्षित असते परंतु माध्यमिक शिक्षणाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारिक कौशल्य प्रदान केल्यास ते या जागतिकीकरणाच्या युगात पैशांचा योग्य तऱ्हेने वापर करू शकते यात शंकाच नाही. शैलेश शिरसाठ. संस्थापक वुई स्मार्ट Money PlanT उपक्रम.

Saturday, 7 January 2023

'उरलं सुरलं' च्या निमित्ताने आयुष्याच्या संध्याकाळी स्नेहीजनांच्या भेटीचा आनंद.

आयुष्य हे क्षणभंगुर आहे असा पण बऱ्याचदा ऐकतो आणि अनुभवतो देखील.आपल्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर होत जातात, बदल होत जातात. बदल हा जीवनातील महत्त्वाचा भाग असला तरी आपल्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी जवळीक असणारे अनेक लोक आज शिक्षण,नोकरी, व्यवसायामुळे एकमेकांपासून दूर राहत असले तरी स्नेह आणि जिव्हाळा आजही कायम आहे.अशा स्नेहाच्या, जिव्हाळ्याच्या माणसांना भेटण्याचा आनंद आई बाबांना दिला.फार वर्षांपूर्वीच्या मैत्रीला उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न उरलं सुरलं च्या निमित्ताने केला.बराच वर्षानंतर आपला मित्र भेटतोय याचा आनंद मी माझे वडील आणि त्यांच्या मित्रांच्या डोळ्यात बघितला.आयुष्याच्या संध्याकाळी आता पुन्हा भेट होईल की नाही,की ही शेवटची भेट आहे या विचाराने बाबा भावुक झाले होत. 'मैं पल दो पल का शायर हूँ' म्हणणाऱ्या सुप्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांच्या खालील ओळी यानिमित्ताने आठवल्या त्यात ते म्हणतात "कल और आएंगे नग़मों की खिलती कलियाँ चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले । आयुष्याच्या संध्याकाळी दोन मित्रांची भेट घडवुन आणण्याचा आनंद आणि समाधान 'उरलं सुरलं' च्या निमित्ताने सध्या घेतोय."✍️ शैलेश शिरसाठ.