आयुष्य हे क्षणभंगुर आहे असा पण बऱ्याचदा ऐकतो आणि अनुभवतो देखील.आपल्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर होत जातात, बदल होत जातात. बदल हा जीवनातील महत्त्वाचा भाग असला तरी आपल्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी जवळीक असणारे अनेक लोक आज शिक्षण,नोकरी, व्यवसायामुळे एकमेकांपासून दूर राहत असले तरी स्नेह आणि जिव्हाळा आजही कायम आहे.अशा स्नेहाच्या, जिव्हाळ्याच्या माणसांना भेटण्याचा आनंद आई बाबांना दिला.फार वर्षांपूर्वीच्या मैत्रीला उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न उरलं सुरलं च्या निमित्ताने केला.बराच वर्षानंतर आपला मित्र भेटतोय याचा आनंद मी माझे वडील आणि त्यांच्या मित्रांच्या डोळ्यात बघितला.आयुष्याच्या संध्याकाळी आता पुन्हा भेट होईल की नाही,की ही शेवटची भेट आहे या विचाराने बाबा भावुक झाले होत. 'मैं पल दो पल का शायर हूँ' म्हणणाऱ्या सुप्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांच्या खालील ओळी यानिमित्ताने आठवल्या त्यात ते म्हणतात "कल और आएंगे नग़मों की खिलती कलियाँ चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले । आयुष्याच्या संध्याकाळी दोन मित्रांची भेट घडवुन आणण्याचा आनंद आणि समाधान 'उरलं सुरलं' च्या निमित्ताने सध्या घेतोय."✍️ शैलेश शिरसाठ.
Excellent heart touching feelings
ReplyDelete