Friday, 14 November 2025

जनजाती गौरव पंधरवाडा — भगवान बिरसा मुंडा जयंती.

जनजाती गौरव पंधरवाडा — भगवान बिरसा मुंडा जयंती

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फुलपाट — ता. धरणगाव, जि. जळगाव

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट येथे 'जनजाती गौरव पंधरवाडा' अंतर्गत भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त दिनांक १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विविध उपक्रम राबवून जनजाती गौरव पंधरवाडा उत्साहात साजरा करण्यात आला.

 आज १५ नोव्हेंबर २०२५ रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. यावेळी त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याची, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाची तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अमूल्य योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यानंतर शाळेत उपस्थित असलेल्या आदिवासी महिला व आदिवासी बांधवांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री भटू नामदेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी पेहरावात उपस्थित राहून आपली संस्कृती अभिमानाने सादर केली. मुलांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उर्जा व उत्साह लाभला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री शैलेश शिरसाठ यांनी केले.

अशा प्रकारे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जनजाती गौरव' दिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.





जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट, ता.धरणगाव, जि. जळगाव येथे बाल दिवस उत्साहात साजरा.

  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट, ता.धरणगाव, जि. जळगाव येथे बाल दिवस उत्साहात साजरा.

आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

यानिमित्त मुख्याध्यापक श्री भटू नामदेव पाटील यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले तसेच त्यांच्या कार्यांविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच 15 नोव्हेंबर रोजी साजरी होणाऱ्या बिरसा मुंडा जयंतीच्या पार्श्वभूमीवर  बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने  शाळेत चित्रकला स्पर्धा व वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी उत्साहाने या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. आदिवासी वीर योद्धा बिरसा मुंडा यांचे कार्य, त्यांचे योगदान आणि त्यांनी दाखवलेला संघर्ष याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री शैलेश शिरसाठ यांनी केले.





Wednesday, 15 October 2025

वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा.

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फुलपाट.ता.धरणगाव जि.जळगाव येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा.

भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस शाळेत वाचन प्रेरणा दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भटू नामदेव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “डॉ. कलाम यांचे जीवन हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्यासारखे मोठे स्वप्न पाहून त्यांची पूर्तता करण्यासाठी वाचनाची सवय ही पहिली पायरी आहे.”

शाळेतील शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “वाचन ही केवळ सवय नाही तर व्यक्तिमत्त्व घडविण्याची गुरुकिल्ली आहे. रोज काहीतरी नवीन वाचल्याने विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो.”

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पुस्तकांबद्दल अनुभव मांडले, कवितांचे वाचन केले आणि ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश दिला.


वाचन प्रेरणा दिवस- ऑनलाईन प्रश्नावली.👇

https://quizzory.in/id/5f87c67465356d7bee6f9d2e

Sunday, 12 October 2025

'वनराई बंधारा' उपक्रम ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकसहभागातून संपन्न.

'वनराई बंधारा' हा ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकसहभागातून केवळ जलसंवर्धनाचा नव्हे तर सामाजिक एकात्मतेचा आणि पर्यावरण जपण्याचा उत्कृष्ट शासकीय उपक्रम आहे. सदर उपक्रम फुलपाट, टहाकळी येथे संपन्न झाला

 शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाचे महत्त्व:

  • जाणिव निर्माण करणे:

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात जलसंवर्धनाची जाणीव पोहोचते.“प्रत्येक थेंब मोलाचा” हा संदेश ते आपल्या घरी आणि समाजात पोहोचवू शकतात.

  •  प्रत्यक्ष सहभाग:                                            विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बंधारे बांधकाम पाहू शकतात, स्वयंसेवक म्हणून मदत करू शकतात, झाडे लावू शकतात.
  • शैक्षणिक उपक्रमांशी संलग्नता:

विज्ञान, भूगोल आणि पर्यावरण शिक्षण विषयांत “जलचक्र”, “भूजल संवर्धन” यांसारख्या संकल्पनांचे प्रत्यक्ष उदाहरण वनराई बंधाऱ्यांतून समजते.

  •  सामाजिक जबाबदारीची जाणीव:

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये “गाव माझं, जबाबदारी माझी” ही भावना दृढ होते.

  •  जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे:

विद्यार्थी प्रदर्शन, निबंध, पोस्टर स्पर्धा, रॅली किंवा घोषवाक्यांच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व इतरांना पटवून देऊ शकतात.

  • राष्ट्रीय योगदान:

पाणी वाचवणे म्हणजे शेती, अन्नसुरक्षा आणि पर्यावरण वाचवणे — हे राष्ट्रनिर्मितीत थेट योगदान आहे. विद्यार्थी भविष्यात सजग नागरिक बनतात.

  • पर्यावरण संवर्धनाशी नाते:

बंधाऱ्यांमुळे पाण्याबरोबरच हरितपट्टा टिकतो. विद्यार्थी झाडलावणी आणि स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारतात.

🌱 

वनराई बंधारा हा "लोकसहभागातून जलसंपन्न भारताकडे" जाण्याचा मार्ग आहे.

शालेय विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग केवळ शिक्षणापुरता मर्यादित नसून, तो त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास, सामाजिक बांधिलकीस आणि पर्यावरणप्रेमी नागरिक होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो.




Saturday, 13 September 2025

 लोककलेचा दैदिप्यमान वारसा असणाऱ्या मराठी मातेला आणि मातीला सलाम म्हणजे The Folk आख्यान. यातूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या लोककलेची परंपरा, पारंपारिक वाद्य आणि एकूणच पारंपारिक संगीत विद्यार्थ्यांना माहीत व्हावं म्हणून कवायतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा हा एक प्रयत्न....

 शरीरासोबतच मनाचा आणि आनंददायी अनुभवांची मांडणी तुम्हाला नक्की आवडेल. शालेय कवायतीच्या कार्यक्रमात अशा लोककला-आधारित आख्यानाचा समावेश केल्याने अनेक सकारात्मक परिणाम घडतात.

• सांस्कृतिक जाणीव निर्माण होते: विद्यार्थी आपल्या मातृभूमीच्या संस्कृतीशी जोडले जातात, परंपरेबद्दल अभिमान निर्माण होतो.

• शारीरिक तंदुरुस्ती सोबत मानसिक समाधान: कवायतीत हालचाल, लय, ताल आणि टीमवर्क यामुळे शरीर आणि मन दोन्ही सशक्त होतात.

• कलात्मक अभिव्यक्तीचा विकास: नृत्य, गाणी, वाद्य यांद्वारे विद्यार्थ्यांना स्वतःची अभिव्यक्ती करण्याची संधी मिळते.

• सामूहिकता आणि शिस्त: गटाने आख्यान सादर करताना विद्यार्थ्यांना शिस्त, समन्वय, सहकार्य आणि नेतृत्वगुण शिकायला मिळतात.

• आनंददायी अनुभव: पारंपरिक संगीताची लय, वाद्यांची गूंज, पोशाखांचे सौंदर्य आणि नृत्याची धडधड हे सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

थोडक्यात, शालेय कवायतीच्या माध्यमातून लोककलेचा आनंददायी अनुभव सादर केल्याने अनेक सकारात्मक परिणाम घडतात.

• सांस्कृतिक जाणीव निर्माण होते: विद्यार्थी आपल्या मातृभूमीच्या संस्कृतीशी जोडले जातात, परंपरेबद्दल अभिमान निर्माण होतो.

• शारीरिक तंदुरुस्ती सोबत मानसिक समाधान: कवायतीत हालचाल, लय, ताल आणि टीमवर्क यामुळे शरीर आणि मन दोन्ही सशक्त होतात.

• कलात्मक अभिव्यक्तीचा विकास: नृत्य, गाणी, वाद्य यांद्वारे विद्यार्थ्यांना स्वतःची अभिव्यक्ती करण्याची संधी मिळते.

सामूहिकता आणि शिस्त: गटाने सादर करतांना विद्यार्थ्यांना शिस्त, समन्वय, सहकार्य आणि नेतृत्वगुण शिकायला मिळतात.

आनंददायी अनुभव: पारंपरिक संगीताची लय, वाद्यांची गूंज, गणवेशाचे सौंदर्य आणि नृत्याची धडधड हे सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

 विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देऊया, त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीण घडवून आपल्या संस्कृतीची नाळ भावी पिढ्यांशी घट्ट बांधूया.

Thursday, 11 September 2025

स्व.विजय हिम्मतराव चौधरी यांच्या कुटुंबाचे दातृत्व.

स्व.विजय हिम्मतराव चौधरी सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वितरण.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी,ता .धरणगाव जि जळगाव.येथे आज शाळेचे दिवंगत शिक्षक विजय हिम्मतराव चौधरी सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्व.विजय चौधरी सर यांच्या कुटुंबीयांतर्फे विजय सरांच्या जन्मदिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामागील हेतू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होऊन त्यांच्या शिक्षणातील आवड वाढवणे हा होता.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल दिगंबर पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील शिक्षक श्री विश्वास पाटील यांनी व सूत्रसंचालन शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी केले. याप्रसंगी दिवंगत शिक्षक विजय चौधरी यांच्या शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमा संबंधित आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यानंतर त्यांच्या परिवारातील सदस्यांनी विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री भटू पाटील सर यांनी आठवणींना उजाळा करून देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. छायाताई घुगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात सांगितले की, पितृपक्षात श्राद्ध केले जाते त्याच भावनेतून कर्तव्यभावनेने समाजासाठी योगदान देणे अधिक महत्त्वाचे आहे आणि याच भावनेतून विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू देऊन शिक्षकांच्या कार्याची आठवण करून देणे ही एक प्रेरणादायी कृती आहे असे प्रतिपादन केले.

 विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या सरांच्या स्मृती प्रित्यर्थ मिळालेल्या शालोपयोगी वस्तूंच्या उपयोगाने शैक्षणिक स्वप्नांच्या पूर्ततेचा संकल्प केला. 

स्व.विजय चौधरींचे वडील हिंमतराव बोमटू चौधरी आणि आई सरलाबाई हिंमतराव चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी विशेष शुभेच्छा पाठवल्या. याप्रसंगी विजय चौधरी सरांच्या पत्नी पल्लवी विजय चौधरी, मुलगा मयूर (साई)विजय चौधरी, मुलगी श्रद्धा विजय चौधरी, भाऊ निलेश हिंमतराव चौधरी, वहिनी योगिता निलेश चौधरी, विजय चौधरी सरांचे शालक हर्षल‌ भागवत चौधरी उपस्थित होते.

हा उपक्रम शाळेसाठी हृदयस्पर्शी आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना विजय सरांच्या स्मृतींना उजाळा देणारा ठरला.

Miss You विजू भैय्या.....