जिल्हा परिषद विद्यार्थी आणि शिक्षकांचा पॉडकास्ट Spotify anchor FM वर🙏
मित्रांनो सस्नेह नमस्कार,
शालेय जीवनाच्या प्रारंभी अक्षरांची ओळख आणि वाचनाचा आनंददायी प्रवास तुम्हाला आजही आठवत असेल. स्वतः वाचन लेखन करता येण्याचा आनंद काही औरच असतो, अडखडत वाचन करत आपण सरावानं अस्खलितपणे वाचायला शिकतो.
*' वाचन ते पॉडकास्ट व्हाया अभिवाचन '* या *स्टोरी टेलिंग* सदरात सर्वांचे स्वागत.आज आपण *चिडखोर गीताची गोष्ट* ऐकणार आहोत.
या स्टोरी टेलिंग ची निर्मिती आणि वाचन केले आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरी येथील शिक्षक शैलेश शिरसाठ यांनी.त्यांच्यासह शाळेतील इयत्ता सहावी चे विद्यार्थी कु.दक्षता कैलास बोरसे आणि हेमंत अनिल सोळुंके हे देखील सहभागी आहेत चला तर मग ऐकूया चिडखोर गीताची गोष्ट...👇
मित्रांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिक जाणून घेऊया..
कुठल्याही प्रकारच वाचन,अभ्यास तार्किक विचार, समतेचा अर्थ नजाणून घेणारे, जातीभेद मानणारे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न न करणारे, विवेक बुद्धी जागृत नसणारे तर बाबासाहेबांना कधीही समजून घेऊ शकत नाही कारण तेवढा आवाकाच नाही वाचनाचा आणि वाचन असल तरी ते कपल कल्पित भंपक काल्पनिक कथांचे.मित्रांनो आपण समतावादी विचारवंतांचे साहित्य वाचन वाढवूया. आपण जर काल्पनिक चमत्काराला नमस्कार करणाऱ्या भाकडकथांचे वाचन करणार असाल तर मग आपलं प्रबोधन होणे कठीण आहे कारण असं चिकित्सेला, वैज्ञानिक दृष्टीकोनाला नाकारणारे साहित्य वाचन आपल्याला बौद्धिक गुलामगिरीकडे नेत असते.
मित्रांनो ज्या लोकांना वाचायला, अभ्यास करायला खरा इतिहास समजून घ्यायला वेळच नाही अशा आपल्या बांधवांपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि विशेषतः फुले,शाहू,आंबेडकर,राजाराम मोहन रॉय यांच्यासारख्या कर्त्या सुधारणावादी महामानवांचे विचार पोहोचवूया.
दुर्दैवाने भारतात असंख्य लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळालेच नाही तसे पाहिले तर जगात जिथे जिथे भेदभाव आहे, समतेचा अभाव आहे अशा ठिकाणी तिथल्या मानवी मूल्यांच्या लढ्यासाठी, न्याय हक्कासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अखंड प्रेरणास्त्रोत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वंचितांचे नेतृत्व करणारे महामानव आहेत,कारण त्यांनी वर्णव्यवस्थेतील सर्व जातींचा सर्व धर्मातील स्त्रियांचा तसेच ओबीसींचा सर्वप्रथम विचार केला मग स्वतःच्या जातीचा.असे असल्यावरही आज बहुजनांच्या घरात बाबासाहेबांच्या तसबीरी आहेत का ? याचा ज्यांनी त्यांनी विचार करावा. आता बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत तसबीरी घरात लावण्याची गरज काय? असा न पटणारा युक्तिवाद ही मंडळी करू शकतात कारण अशी माणसं जाती जातीत महापुरुषांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विभागणीच करतात आणि स्वतःच्या जातीशी संबंधित असणाऱ्या महापुरुषांच्या प्रतिमा मात्र आवर्जून घरात स्थापित करतात.आजही आपण कुणाच्याही घरात जाऊन तिथे असणार्या प्रतिमांवरून त्यांची जात ओळखू शकतो. याला काही ठिकाणी अपवादही असेल परंतु तेही अपवादानेच हे खेदाने नमूद करावसं वाटतं.आपल्या देशाबाबत विचार करायचा झाल्यास ओबीसींसह सर्व समाज घटकांचे, सर्व महिलांचे ,एकंदरीतच मानवतेचे मसीहा म्हणजे विश्वरत्न,आधुनिक जगाचे खरे नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत.
खरं पाहता ओबीसींना *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जाती आधी ओबीसींसाठीचे आरक्षण दिले, तेही कायद्याने.....*
कळत नकळत काही समाज घटक स्वतःला मागासवर्गीय बांधवांपेक्षा वेगळे आणि उच्च समजण्याची चूक करतात.
देशातील सर्वच महामानवांना, समाज सुधारकांना जातीपातीत न विभागता जातीअंताचे मार्गदर्शक म्हणून जाणून घेणं महत्त्वाचं आहे,कारण हा लढा जातीपातींचा नसून मानवीय मूल्यांचा लढा आहे असं मला व्यक्तिशः वाटतं.
महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानणारे आणि त्यांच्या सामाजिक विचारांवर कार्य करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय महिलांना कायद्याने सक्षमीकरणाच्या वाटा खुल्या करून दिलेल्या आहेत म्हणून भारतीय महिलांचे खऱ्या अर्थाने बाबासाहेब दैवत आहे,ते तर त्यांच्या गळ्यातील ताईतच पाहिजे...✍️