Saturday, 1 July 2023

जातीनिहाय जनगणनेचा आग्रह रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये....

रोगापेक्षा इलाज भयंकर असे होऊ नये म्हणून.... जातीनिहाय जनगणना करण्यापेक्षा ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवणे अधिक सोपे असेल का ? याचा विचार करण्यास हरकत नाही. अनेकतेत एकता अशी जगभरात ओळख असणारा आपला भारत देश आहे. एकविसाव्या शतकात आधुनिक तंत्रज्ञाने आपण खूप प्रगती केली असली तरी आप आपल्या जातीची अस्मिता राष्ट्रीय एकात्मतेच्या आड येऊ नये याची काळजी घेणे आपल्या सर्वांच कर्तव्य आहे.जातीय जनगणना झाल्यास बहुसंख्या असणाऱ्या काही घटकांना अति आत्मविश्वास वाटून त्याचा उपयोग व्यवस्थेवर दबाव तंत्र म्हणून होऊ शकतो तसेच कमी संख्या असणाऱ्या जाती गटांना असुरक्षिततेची भावना देखील वाटू शकते. अर्थात या सर्व शक्यता आहेत समाजातील प्रत्येक घटक या पद्धतीने विचार करू शकतो असे नाही. फक्त या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की जाती धर्मात तेढ वाढून देश विघातक उपद्रव मूल्यांचा उपद्रव अधिक होऊन तो एकात्मतेस बाधक होऊ नये. जनगणना जातीनिहाय झालीच तरी ती जातीयत्वतेपेक्षा भारतीयत्वाची अधिक असावी एवढेच.... बागेची सुंदरता ही त्या बागेत असणाऱ्या विविध वैशिष्ट्य असणारी फुल-फळ झाडांमुळे आहे.

No comments:

Post a Comment