Sunday 7 April 2024

विद्यार्थी हा विविध सामाजिक घटकांकडून (समाजातून) विविध समाज माध्यमातून,दूरचित्रवाणीवरील भाकड कथांमधून,भाकड अवैज्ञानिक प्रवचनांमधून खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा घेऊनच शाळेत येत असतो.
विद्यार्थी हा शाळेच्या चार भिंती बाहेर समाजा कडून खूप काही शिकत असतो. अशा वेळेला विद्यार्थ्यांना शाळेतून वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला पाहिजे म्हणजे ते ग्रहणासारख्या खगोलशास्त्रीय घटनेकडे का? कोठे ? कसे ? अशा जिज्ञासा वृत्तीने बघतील आणि विवेकाने जाणून घेतील.
ग्रहण समज गैरसमज विद्यार्थ्यांना का? कोठे ? कसे ? अशा पडलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्यात असलेल्या नैसर्गिक जिज्ञासेला, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि प्रत्यक्ष प्रयोगातून, विवेकाने स्पष्टीकरण देणे महत्त्वाचे आहे, मग प्रत्येक इयत्तेच्या पाठ्यक्रमात ग्रहणाचा पाठ असो किंवा नसो.
विविध वैज्ञानिक प्रयोग आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या माध्यमातून ग्रहणांसह सर्वाच घटनांविषयी विद्यार्थ्यांत कार्यकारणभाव समजून घेणे वाढेल आणि गैरसमज दूर होतील.

No comments:

Post a Comment