मराठीतील बाण वर्मी लागणं, शाल जोडीत लगावणे आणि घरचा आहेर मिळणं या वाक्यप्रचारांच यथार्थ उदाहरण माझ्यासारख्या कुठलीही झुल न पंघरलेल्या विवेकी, समतावादी माणसाला सध्या पहावयास आणि ऐकण्यास मिळत आहे,निमित्त आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुकुटमनी अख्ख विद्रोही साहित्य संमेलन बोलत असल्याचा अनुभव मला आला.
मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत ऐकलेल्या सर्वोच्च भाषणांपैकी एक भाषण म्हणून तारा भवाळकरांच्या भाषणांचा उल्लेख करेल. आपण नक्की नक्की ऐका..✍️
No comments:
Post a Comment